सकाळ वृत्तसेवा
भारत-पाकिस्तानमध्ये आता 'आंबा'वरूनही वाद आहे. ही कहाणी रटौल आंब्याची आहे!
१९८० मध्ये पाकिस्तानी राष्ट्रपती झिया-उल-हक यांनी इंदिरा गांधींना 'रटौल' आंबा भेट दिला आणि वाद सुरू झाला.
झिया-उल-हक म्हणाले की, "रटौल आंबा फक्त पाकिस्तानमध्येच पिकतो."
उत्तर प्रदेशातील रटौल हेच या आंब्याचे मूळ गाव आहे, असे भारताने सांगितले.
इंदिरा गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा दावा खोटा ठरवला.
हा आंबा लहान, खूप गोड आणि सुगंधित असतो.
फाळणीपूर्वी रटौल गावातून काही रोपे पाकिस्तानातील नर्सरीत पाठवली होती.
असोसिएशनचे सचिव जुनैद फरीदी सांगतात की, त्यांचे आजोबा अफाक फरीदींनीच ती रोपे पाठवली होती.
भारत 'रटौल आंबा आमचा' म्हणतो, तर पाकिस्तान 'आमच्याकडे तो चांगला पिकतो' असा दावा करतो!