रोहित कणसे
जर तुम्ही रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपी जात असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, डॉक्टर प्रत्येकाने रात्रीच्या जेवणानंतर थोडंसे पायी चालण्याचा सल्ला देतात.
रात्री जेवण केल्यानंतर १५ ते २० मिनीटं चालल्याने पचन व्यवस्थित होण्यात मदत होते, तसेच पोटाची चर्बी देखील कमी होते.
आज आपण रात्रीच्या जेवणानंतर फिरायला जाण्याने होणारे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
जेवणानंतर किमान २० ते ३० मिनीट चालल्याने वजन कमी होते, तसेच पोटाची चर्बी देखील कमी होते.
रात्रीच्या जेवणानंतर अन्न पचवण्याची प्रक्रिया कमी होते, मात्र चालल्याने ही प्रक्रिया वेगाने होते आणि अन्न लवकर पचते.
बऱ्याचदा तणावामुळे अनेकांना झोप लागत नाही पण जेवण केल्यानंतर फिरल्याने चांगली झोप येते.
टाइप २ डायबिटीज रुग्णांना जेवण केल्यानंतर थोडावेळ पायी फिरण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे ब्लड शुगर कमी होते.
जेवण केल्यानंतर रोज कमीत कमी १५ ते २० मिनीटं चाललं पाहिजे, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्तही चालू शकता.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित असून योग्य सल्ल्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
नवीन कपडे धुतल्या नंतर का घालावे?