Monika Shinde
उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले की, आंब्याची आठवण होतेच. पण महाराष्ट्रात कोणता आंबा सर्वात प्रसिद्ध आहे, माहित आहे का?
फळांचा राजा आंबा लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचं आवडतो. आंबा हा फळांचा राजा मानला जातो.
महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आंबा म्हणजे कोकणी हापूस किंवा अल्फोन्सो आंबा. हे मुख्यतः रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात मिळतो.
अप्रतिम सुगंध, लुसलुशीत गर, मधासारख गोड आणि मोठ्या प्रमाणत निर्यात होणारा सर्वोच्च दर्जाचा आंबा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हापूस आंब्याला GI (Geographical Indication) टॅग मिळालेला आहे. याची खासियत जागतिक पातळीवर ओळखला जातो.
हापूस आंबा यूएई, युके, अमेरिका, जपान अशा देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. महाराष्ट्राचे हे सोने जगात चमकते.