सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात रोगराई पसरते, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक आहे
पावसाळ्यामध्ये घर आणि परिसर स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे
जेवणापूर्वी हमखास हात स्वच्छ धुवावेत आणि बाहेर पडल्यानंतर सतत सॅनिटायझर सोबत ठेवावे
पावसाळ्यामध्ये सर्वत्र चिकचीक होते आणि त्यामुळे डास आणि माशा वाढतात
घरात येणाऱ्या माशांचा बंदोबस्त करणं हे अगत्याचं असतं
फळे आणि भाज्या खाण्यापूर्वी नेहमी शुद्ध पाण्याने धुवून घ्याव्यात
पावसाळ्यात पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळावं
बाहेरच्या आणि अस्वच्छ खाण्याने आम्लपित्त, गॅस याचा त्रास होऊ शकतो
याशिवाय पावसाळ्यामध्ये तळलेले, जड, चरबीयुक्त पदार्थ टाळावेत