Aarti Badade
पावसाळी व आर्द्र हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला व व्हायरल इन्फेक्शनसारखे आजार वाढत आहेत.
डास व हवामान बदलामुळे साथीचे रोग पसरू शकतात, त्यामुळे स्वच्छता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
ताप, खोकला, उलटी यांसारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी धूळ व धूर टाळावा.गुडघेदुखी, संधिवात व दमा अशा आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
महिलांनी त्वचा विकारांपासून बचावासाठी योग्य त्वचा काळजी घ्यावी. कोरडी त्वचा, फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी मॉइश्चरायझर व अँटिफंगल पावडर वापरावी.
गर्भवती महिलांनी सकस आहार घ्यावा.हिरव्या भाज्या, फळे, सूप व योग्य प्रमाणात व्यायाम व योगासनांचा अवलंब करावा.
लहान मुलांना थंड पदार्थ, जंकफूड देणे टाळावे. त्यांना तुळस-आलं-मध यांसारखे आयुर्वेदिक उपाय व व्हिटॅमिन C युक्त फळे द्यावीत.
सर्वांनीच स्वच्छता व प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर द्यावा. कोमट पाणी प्यावे, वेळेवर जेवण घ्यावे आणि पुरेशी झोप घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.