Shubham Banubakode
प्राचीन काळापासून कबुतरांचा वापर संदेशवहनासाठी केला जातो आहे. मुघल कालखंडही त्याला अपवाद नव्हता.
मुघलांच्या काळात कबुतरांचा वापर संदेश पोहोचवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी केला जाता होता.
मघल दरबारात इतर देशांमधून कबुतर आणली जात होती. अकबराने फरगण्याहून कबुतर आणली होती. सोबतच कुशल कबुतर-पालकही आणले होते.
अकबरच्या दरबारात एकूण २०,००० कबुतरे होती, त्यापैकी ५०० अकबरची खास कबुतर होती. अकबर छावणीबरोबर कबुतरही बरोबर घेवून जात होता.
मुघल काळात १०० उडत्या कबुतरांसाठी चार शेर धान्य दिले जात होते, तर इतर कबुतरांसाठी पाच शेर धान्य दिले होते. जर ती जोडीने ठेवली असतील, तर ७.५ शेर धान्य दिले जात होते.
उडत्या कबुतरांना फक्त बाजरी दिली जात होती, परंतु इतर कबुतरांना सात प्रकारचे मिश्र खाद्य दिले जात होते. यात तांदूळ, हरभरा, मूग, बाजरी, करार, लाहदरह व ज्वारी यांचा समावेश होता.
कबुतरांच्या संगोपनासाठी १५ नोकर नियुक्त करण्यात आले होते. त्यांना लष्करी विभागातून पगार मिळत होता. हा पगार दरमहा २ रुपयांपासून ४८ रुपयांपर्यंत होता.
वरील माहिती ‘आइन-ए-अकबरी’ मध्ये नमूद आहे.