संतोष कानडे
मुघल शासकांच्या बेगमसुद्धा हरममध्ये रहायच्या. हरममध्ये कधी शेकडो तर कधी हजारो महिला असायच्या.
हरम हा मुघलांच्या अय्याशीचा उड्डा असायचा. नाचगाणं, व्यभिचार.. सगळंच तिथं चालायचं.
मुघल बादशहा आपल्या बेगमांच्या सगळ्या आवडी पूर्ण करण्यासाठी वाट्टेल तेवढे पैसे खर्च करायचे.
हरममधल्या राण्या शाही शौक ठेवायच्या. एकदा वापरलेली गोष्टी त्या पुन्हा वापराच्या नाहीत.
त्यांचे कपडेसुद्धा त्या पुन्हा वापरत नसायच्या. एकदा वापरलेल्या कपड्यांकडे त्या ढुंकूनही बघत नव्हत्या.
हररमध्या राहणाऱ्या राण्या जे कपडे एकदा घालत असत, त्याचा स्पर्श पुन्हा कधीच शरीराला होऊ देत नव्हत्या.
राण्यांनी वापरलेले कपडे त्यानंतर दासी वापरायच्या. त्यामध्ये हवे तसे बदल करुन कपडे पुन्हा वापरात आणले जायचे.
केवळ कपडेच नाही तर मेकअपचं सामानही दुसऱ्यांदा वापरल जात नसे.
मेकअपच्या सामानवरही नंतरचा हक्क दासींचाच असायचा. त्यामुळे दासी महिलांची चंगळ व्हायची.
हरमच्या सुरक्षेसाठी किन्नरांची नियुक्ती केलेली असायची, तशा नोंदी इतिहासात आढळतात
परपुरुषाची सावलीसुद्धा हरमवर पडता कामा नये, असा कटाक्ष होता. कुणी हिंमत केलीच तर त्याला कठोर शिक्षा दिली जायची.