kimaya narayan
मुघलांच्या इतिहासातील सगळ्यात बलशाली बादशाह म्हणजे सम्राट अकबर. सम्राट अकबरामुळे भारताच्या इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण बदल पाहायला मिळाले.
सम्राट अकबर आणखी एका कारणामुळे लोकप्रिय झाला ते त्याच्या राण्यांमुळे. अकबरने तेरा ते चौदा लग्न केल्याचं म्हटलं जातं. तर त्याच्या हरेममध्ये अनेक स्त्रियांचा वावर होता.
सम्राट अकबरच्या तीन महत्त्वाच्या राण्या होत्या. रुकीया सुलतान बेगम, सलिमा सुलतान बेगम आणि मरियम-उझ-जमानी होतं.
पण अकबरची सगळ्यात लाडकी राणी होती मरियम-उझ-जमानी. मरियम ही एका हिंदू राजपूत परिवारातून होती. असं असूनही तिने सम्राटाच्या मनावर राज्य केलं.
मरियमचं मूळ हिंदू नाव अज्ञात आहे. पण तिला राजकुमारी हीराकुंवारी असं म्हटलं जात असे. याशिवाय हरखाबाई,जिया राणी , मानमती बाई , हरिकाबाई , हिरा कुंवरी,शाही-बाई, शाही बेगम या नावांनीही इतिहासात तिचा उल्लेख केला आहे.
तिचा जन्म १ ५ ४ २ आमेरचे भारमल आणि राणी चंपावती राव गंगा यांच्या पोटी झाला. एका राजकीय संघर्षांमुळे मरियमचं लग्न तिच्या वडिलांना सम्राट अकबराशी भाग पडलं.
लवकरच मरियमने स्वतःच्या बुद्धी आणि कर्तृत्वाने सम्राटाच्या मनात आणि राजदरबारात महत्त्वाचं स्थान. ती त्या काळातील सगळ्यात श्रीमंत होती महिला आणि अकबराची सल्लागार होती. याशिवाय ती पुढील मुघल सम्राट जहांगीर म्हणजेच सलीमची आई होती.
तिच्या वडिलांच्या विनंतीमुळे मरियमला अकबराशी लग्न केल्यानंतर धर्मांतर करावं लागलं नाही. तसंच तिला हिंदू धर्माचे पालन करण्यास संमती होती. तिच्या राजवाड्यात भगवान कृष्ण आणि शंकराची चित्रे होती.
याशिवाय ती एक उद्योजिका होती. ती एक मोठी आणि यशस्वी व्यापारी होत. ती व्यवसायात विलक्षण रस घेत असे.