Saisimran Ghashi
ज्योतिबा किंवा केदारेश्वर हे ब्रह्मा, विष्णू, महेश व जमदग्नी यांच्या क्रोधांशाचे तेजोमय रूप आहे. 'ज्योत' म्हणजे तेज, प्रकाश त्यावरूनच 'ज्योतिबा' हे नाव आले आहे.
वाडीरत्नागिरीचा जोतिबा म्हणजे 'तेज' या पंचमहाभूतांपैकी एका तत्वाचे दैवत आहे. त्यामुळे हे स्थान अत्यंत पवित्र व शक्तीपूर्ण मानले जाते.
सध्याच्या भव्य देवालयाच्या जागी पूर्वी छोटे मंदिर होते, जे किवळ (ता. कराड) येथील नावजी या भक्ताने बांधले होते.
मूळ मंदिराच्या जागी ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी काळ्या बेसाल्ट दगडात भव्य मंदिर पुन्हा बांधले.
हे मंदिर इ.स. १८०८ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधले असून, ते खांबांशिवाय उभे असलेले अद्भुत रचना आहे.
चर्पटअंबा (चोपडाई) मंदिर इ.स. १७५० मध्ये प्रीतीराव चव्हाण यांनी बांधले, तर रामेश्वराचे मंदिर इ.स. १७८० मध्ये मालजी निकम यांनी बांधले.
केदारेश्वर समोर नंदीच्या मूर्ती, पूर्वाभिमुख सटवाई, पश्चिमेला रामलिंग आणि भिंतींवर वीरगळ दगड मंदिराची ऐतिहासिकता दाखवतात.
ज्योतिबा (केदारनाथ) यांनी बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. त्यांच्या मूळ अवतरण स्थळाचे स्मरण म्हणून हिमालयात 'केदारलिंग' स्थापन केले, म्हणून त्यांना केदारेश्वर म्हणतात.