Shubham Banubakode
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकापूर्वी व्रतबंध (मुंज) विधी शुक्रवारी पार पडला. यानंतर तुलापुरुषदान झाले. सुवर्ण, चांदी, तांबे आणि फळे, साखर यांची तुला करण्यात आली.
शनिवारी शिवाजी महाराजांचे समंत्रक विवाह झाले, कारण मुंजीनंतर पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. सोयराबाईंना पट्टराणी म्हणून स्थान देण्यात आले.
रविवारी ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त होता. अग्निप्रतिष्ठा झाली. सर्व विधी पूर्ण झाल्यावर आचार्य आणि ऋत्विजांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.
सोमवारी ग्रहयज्ञ आणि नक्षत्रहोम विधी पार पडले. हे विधी राज्याभिषेकासाठी शुभ मानले गेले.
मंगळवारी कोणताही शुभ मुहूर्त नसल्याने या दिवशी कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत.
बुधवारी नहात्रयज्ञ विधी पार पडला, जो राज्याभिषेकाच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग होता.
गुरुवारी रात्री निऋतियाग यज्ञ झाला. यावेळी मांस, मत्स्य आणि मदिरा यांच्या आहुती देण्यात आल्या. यानंतर शिवाजी महाराज व सोयराबाईंनी स्नान करून पुण्याहवाचनासाठी स्थान ग्रहण केले.
शुक्रवारी त्रयोदशीच्या मुहूर्तावर सायंकाळपासून पहाटेपर्यंत मुख्य राज्याभिषेक समारंभ थाटामाटात पार पडला.
शिवाजी महाराज सुवर्णचौकीवर बसले आणि अभिषेक झाला.
राज्याभिषेकादरम्यान शिवाजी महाराज सिंहासनावर विराजमान झाले. यावेळी अष्टप्रधानांनी स्थळोस्थळीच्या पवित्र जलांनी सुवर्णकलशातून अभिषेक केला.
सभासदाने लिहिले, “सर्वांना नमन करून महाराज सुवर्णचौकीवर बसले. दिव्य वचने, अलंकार घेऊन सिंहासनावर विराजमान झाले.'' हा सोहळा भारतखंडासाठी ऐतिहासिक ठरला.