सकाळ डिजिटल टीम
पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वांत प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तेथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थानही आहे.
वर्षभरामध्ये केवळ आषाढी अन् कार्तिकीची वारी असते असा अनेकांचा समज असतो परंतु असे नसुन एका वर्षात साधारण चार वाऱ्या केल्या जातात.
भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे. चैत्र शुद्ध एकादशीस 'कामदा एकादशी' म्हणतात.
वराह पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये कामदा एकादशीचे माहात्म्य सांगितले गेले आहे.
आषाढ शुद्ध एकादशीस 'शयन' अथवा 'देवशयनी', 'पद्मा' किंवा 'विष्णुशयनी' एकादशी असे म्हणतात. यादिवशी श्रींचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो तर पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपालकाला होतो आणि रात्री पांडुरंगाची पालखी निघते.
या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण (श्री विठ्ठल) आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासूनच 'चातुर्मासाचे' व्रत आरंभ होते.
कार्तिक शुद्ध एकादशीस 'उत्थान' एकादशीही म्हणतात. या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत उठतात.
या एकादशीनंतर चातुर्मास पूर्ण होतो, यात्रेनंतर चातुर्मासात थांबलेले लोक आपआपल्या गावी परत जातात.
पंढरपुरात ही क्रमांक चारची महत्त्वपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा माघ शुद्ध एकादशीस भरते. माघ शुद्ध एकादशीस 'जया एकादशी' म्हणतात.
या एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठीर यांच्या संवादामध्ये दिले आहे. सर्व पापांचे हरण करणारी, भक्ती प्रदान करणारी ही उत्तम तिथी आहे.
पंढरपूर असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे जिथे चैत्र वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी आणि माघ वारी अशा चार वेळा यात्रा होतात.