आशुतोष मसगौंडे
मेंदूची क्षमता कायमस्वरूपी कमी होते. मेंदूमध्ये असणारे आयक्यूचे आठ पॉइंट्स, यांची क्षमता संपते.
गांजाच्या सेवनामुळे नैराश्य, सतत काळजी वाटणे, आत्महत्येचे विचार वाढीस लागू शकतात.
गांजामुळे मुलांचा वेळ आणि हालचाल यांचा समन्वय कमी होतो.
गांजाच्या प्रभावाखाली गाडी चालविणाऱ्यांचा अपघात होण्याची शक्यता वाढते.
मुलींनी गांजाचे सेवन केल्यास गर्भधारणा न होणे किंवा बाळाच्या आरोग्यावर व त्याच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होतो.
दैनंदिन जीवनात गांजाच्या वापराने नातेसंबंधांवर परिणाम होतो. शैक्षणिक कारकिर्दीमध्ये यश कमी होते आणि आयुष्यातील आनंद उपभोगण्याची क्षमता कमी होते.
आतापर्यंत जे संशोधन झाले आहे, त्यामध्ये असे आढळले आहे की, १८ वर्षांखालील सहा मुले गांजाचे सेवन करू लागली तर त्यातील एक व्यसनाधीन होऊन त्यातून बाहेर येऊ शकत नाही.
प्रौढांमध्ये व्यसनाधीनतेचे हे प्रमाण १०:१ असे आहे. तेव्हा सर्वांनीच गांजा आणि हुक्का या व्यसनांपासून चार हात दूर राहणेच योग्य आहे.