सकाळ डिजिटल टीम
जर कोणाच्या लग्नाला विलंब होत असेल, तर हळदीचा हा उपाय करुन पाहा. हळदीशी संबंधित उपाय केल्यास विवाह लवकर जुळून येतो.
धार्मिक मान्यतांनुसार, हळदीचा संबंध सौभाग्याशी आहे, त्यामुळे त्याचे उपायही प्रभावी मानले जातात.
धार्मिक मान्यतेनुसार, लवकर लग्न जुळण्यासाठी गणपती बाप्पाच्या कपाळावरती हळदीचा तिलक लावा आणि प्रार्थना करावी.
एखाद्याच्या लग्नाला उशीर होत असेल, तर हळद दान करावी. बुधवारी हळद दान केल्याने लवकर लग्न होण्यास मदत होते.
धार्मिक मान्यतेनुसार, सकाळी स्नान केल्यानंतर पाण्यात चिमूटभर हळद मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावी.
ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही, त्यांनी आंघोळीच्या पाण्यात हळद मिसळून स्नान करावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.