Saisimran Ghashi
मंत्री धनंजय मुंडे यांनी संतोष देखमुख हत्या प्रकरणात राजीनामा दिला आहे.
यामध्ये स्पष्टीकरण देताना नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या सोबत हे पहिल्यांदा घडले नाहीये तर त्यांच्या विरोधात यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, तसेच मोठे वाद देखील आहेत.
त्यांच्या विरोधात तीन गुन्हे फसवणूकीचे आहेत. यात पुस (ता. अंबाजोगाई) येथील बलखंडी देवस्थानची शासकीय जमिन अधिकाऱ्यांसोबत संगनमत करुन या जमिनीची खाेटी खरेदी केली म्हणून गुन्हा दाखल आहे.
पुस शिवारात त्यांनी तीन हेक्टर १२ गुंठे जमीन जगमित्र शुगर मिल्सच्या उभारणीसाठी खरेदी केली. यासाठी १० लाख रुपये रोख व ४० लाख रुपयांचा धनादेश धनंजय मुंडेंनी दिला होता. नगदी आठ लाख ८१ हजार रुपये दिले. मात्र, हा चेकही वटला नाही.
तसेच १४ सप्टेंबर १९८८ साली मयत असलेल्या ज्ञानोबा बोईनवाड याच्या नावावर ता. २८ डिसेंबर २०१० साली संमतीपत्र करण्यासाठी इतर कोणाला उभा करुन तोतयागिरी केल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले होते.
त्यांची पत्नी करुणा मुंडे-शर्मा यांनी देखील त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याचा दावा केला होता. हा वाद महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला होता.
जानेवारी २०२१ मध्ये, गायिका रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली होती जी नंतर मागे घेण्यात आली.
आता संतोष देखमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला शय दिल्याबद्दल त्यांच्या विरोधात मोठा वाद सुरू होता आणि त्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती.