Water Crisis : पाणी टंचाईच्या झळा आणि कळा..; पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार!

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : गतवर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा जिल्ह्यातील काही तालुक्यांत पाण्याची तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अजून तीन महिने पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.

Water scarcity in Kolhapur

मानचा धनगरवाडा : येथे दिवसभर बोअरचे पाणी उपसावे लागते. त्यामुळे मुलांचा शाळेत खाडा पडतो.

Water scarcity in Kolhapur

ऐनवाडी पैकी पन्हाळकरवाडी : येथे पूर्वीपासूनच पाणीटंचाई असून, किमान चार-पाच किलोमीटर अंतरावरून पाणी डोक्यावरून आणावे लागते.

Water scarcity in Kolhapur

पिशवीपैकी व्हनागडेवाडी : येथे गेले पंधरा दिवस पाणीटंचाई असल्याने टँकरमधील पाणी भरून घेण्यसाठी उडालेली झुंबड.

Water scarcity in Kolhapur

मानचा धनगरवाडा : येथील गंजलेली पाण्याची चावी.

Water scarcity in Kolhapur

मानोली आंबा : येथील कोळेकरवाडीतील विहिरीचे पाणी कसेतरी दहा दिवस तेही पिण्यासाठी वापरता येईल, अशी स्थिती आहे. (फोटो - बी. डी. चेचर)

Water scarcity in Kolhapur

Kolhapur Loksabha : शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित, संभाजीराजे पोहोचले वाड्यावस्त्यांवर