औरंगजेब मृत्यूपत्रात अखेरच्या क्षणी शिवरायांबाबत काय म्हणाला होता?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा १२ वर्षांनी मोठा होता आणि महाराजांच्या निधनानंतर त्याला आणखी २७ वर्षांचे आयुष्य लाभले. मात्र, शिवाजी महाराजांनी त्याला जो पराभव दिला, तो तो कधीही विजयात बदलू शकला नाही.

Aurangzeb’s will | esakal

आठवण

त्याने मोठी चूक केली होती, त्यामुळे जेव्हा त्याच्या मृत्यूची वेळ जवळ आली, तेव्हा त्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली.

Aurangzeb’s will | esakal

मृत्यूपत्र

औरंगजेबाने आपल्या मुलांसाठी एक मृत्यूपत्र तयार केले, ज्यामध्ये त्याने काही सल्ले आणि 12 सूचना दिल्या. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी आपल्या पुस्तकात या मृत्यूपत्राचा फारसीमधून इंग्रजीत अनुवाद केला आहे.

Aurangzeb’s will | esakal

स्वप्न

या पत्रात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहिलं आहे. औरंगजेबाने आपल्या आयुष्याची शेवटची २६ वर्षे मराठ्यांचं राज्य नष्ट करण्याच्या प्रयत्नात घालवली. परंतु अनेक मावळ्यांनी औरंगजेबाचं हे स्वप्न कधीही पूर्ण होऊ दिलं नाही.

Aurangzeb’s will | esakal

हास्यास्पद

औरंगजेबाच्या छावण्यावर हल्ले करुन मावळ्यांनी औरंगजेबाचे लचके तोडले आणि स्वत:ला हिंदुस्थानाचा बादशाह म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाचा शेवट अतिशय हास्यास्पद झाला.

Aurangzeb’s will | esakal

औरंगजेब

जानेवारी १७०६ रोजी औरंगजेबाने अहमदनरमध्ये माघार घेतली. आता आपलं मरण जवळ आलं हे त्यांच्या लक्षात आलं.

Aurangzeb’s will | esakal

दरबार

तो वारंवार आजारी पडत होता तरी देखील जिद्दीने दरबारात हजेरी लावत होता. त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सगळ्यात मोठी चूक सुधारायची होती. त्यासाठी तो मराठ्यांशी झगडत होता.

Aurangzeb’s will | esakal

औरंगजेबाचा मृत्यू

पण अखेर हा खेळ मराठ्यांना न संपवताच संपला, २० फेब्रुवारी १७०७ रोजी औरंगजेबाचा मृत्यू झाला. 

Aurangzeb’s will | esakal

अंधाधुंदी

मरणाच्या अगोदर औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते अजमा फसाद बख, म्हणजे मेरे बाद फसाद अर्थात माझ्यानंतर अंधाधुंदी माजेल.

Aurangzeb’s will | esakal

मुघल साम्राज्य

याची जाणीव औरंगजेबाला झाली होती म्हणून त्याने आपल्या मुलांसाठी लिहलेल्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले की अंधाधुंदी टाळायची असेल तर मुघल साम्राज्याचे विभाजन करा.

Aurangzeb’s will | esakal

मृत्यूपत्र

म्हणजे लढाया होणार नाहीत आणि कत्तली टळतील. हमीद्दून खान बहादुर यांनी लिहलेल्या पुस्तकार मृत्यूपत्र दिलं आहे. हे खरं पत्र बिकानेर संग्रहालयात आजही आहे.

Aurangzeb’s will | esakal

पापा पासून सुटका

औरंगजेब म्हणतो, पापामध्ये बुडून गेलेल्या माझ्यावतीने पापा पासून सुटका म्हणून हसनच्या कबरीवर माझ्या वतीने चादर चढवा.

आझम

हे काम माझा मुलगा आझम करेल, मी ज्या टोप्या शिवल्या त्याचे चार आणे दोन रुपये आले आहेत. ते माझ्या कफनावर खर्च करावे.

Aurangzeb’s will | esakal

कुरान

कुरानाच्या हस्तलिखीत प्रती विकून आलेले ३०५ रुपये फिकीरांमध्ये वाटून टाकावे.  औरंगजेबाने १२ वी महत्वाची सूचना आपल्या मुलांना दिली.

Aurangzeb’s will | esakal

आधार

राज्याची संपूर्ण माहिती कळणे हा राज्याचा प्रमुख आधार समजला जातो.

Aurangzeb’s will | esakal

बेसावध

औरंगजेब लिहितो, एक क्षणभर जरी बेसावधपणा असला तर अनेक वर्षापासून केलेले कार्य वाया जाण्याची वेळ येते.

Aurangzeb’s will | esakal

नजरकैद

मा‍झ्या निष्काळजीपणामुळे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या नजरकैदेतून पळाले आणि माझ्या मरणाच्या अखेरीपर्यंत मला मराठ्यांशी जीवन मरणाचा संघर्ष करावा लागतो.

Aurangzeb’s will | esakal

सुटका

शिवाजी महाराजांची आग्र्याच्या कैदेतून सुटका झाली १६६६ साली आणि ही गोष्टी १७०७ साली औरंगजेबाला आपल्या मृत्यूच्यावेळी आठवते.

Aurangzeb’s will | esakal

हातावर तुरी

याचे कारण म्हणजे ४० वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी त्याच्या हातावर तुरी दिल्या.

Aurangzeb’s will | esakal

सळो की पळो

त्यानंतर देखील शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मुघलांशी लढले, नंतर मराठ्यांनी देखील मुघलांना सळो की पळो करून सोडले.

Aurangzeb’s will | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कोण होते? 'भोसले' आडनाव कसं मिळालं?

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal
येथे क्लिक करा