Aarti Badade
जेवणानंतर लगेच पाणी प्यावे का?
जेवणानंतर लगेच भरपूर पाणी पिण्याऐवजी थोडा वेळ थांबणे योग्य मानले जाते.
जेवणानंतर थोडा वेळ थांबा
जेवण पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने पाणी प्यायल्याने पचनक्रियेला त्रास होणार नाही.
जेवताना किती पाणी प्यावे?
जेवताना गरज असल्यास थोडे पाणी प्यावे; मात्र वारंवार किंवा भरपूर पाणी पिणे टाळावे.
‘जठराग्नी’बाबत काय म्हटले जाते?
आयुर्वेदिक मान्यतेनुसार जेवताना पाणी जास्त प्यायल्यास जठराग्नी मंद होऊन अपचन होऊ शकते.
पचनासाठी काय करावे?
जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थांबून तहान लागल्यावर पाणी पिण्याची सवय ठेवावी.
तिखट जेवण असेल तर?
जेवण तिखट असल्यास किंवा ठसका लागत असल्यास जेवताना गरजेनुसार थोडे पाणी पिऊ शकता.
पाण्याबाबत संतुलन महत्त्वाचे!
पाणी पूर्णपणे टाळण्याची गरज नाही; दिवसभर पुरेसे पाणी प्या आणि जेवताना गरजेनुसारच सेवन करा.