Amit Ujagare (अमित उजागरे)
१९४७ मध्ये इंग्रजांचं राज्य संपलं आणि भारताची फाळणी होऊन भारत, पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण झाली.
मोठं नुकसान
पण यामुळं भारताचं अनेक बाबतीत मोठं नुकसान झालं, पण जर ही फाळणी झाली नसती तर आज काय परिस्थिती असती?
विस्थापित
सर्वात पहिलं म्हणजे या फळणीदरम्यान जळपास २ कोटी लोक विस्थापित झाले अन् २० लाख लोकांचे मृत्यू झाले, हे झालं नसतं.
सर्वाधिक लोकसंख्या
भारतात सध्या ७८ टक्के हिंदू, १४ टक्के मुस्लिम आहेत. पण अखंड भारत असता तर लोकसंख्येच हे प्रमाण ६२ टक्के हिंदू, ३२ टक्के मुस्लिम असं असतं. देशाची एकूण लोकसंख्या १७६ कोटी असती, जी जगातील सर्वाधिक लोकसंख्या असती.
घुसखोरी
जर भारत अखंड असता तर तो आजपेक्षा अधिक विविधतेनं नटलेला असता. ईशान्य भारतातील आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांची घुसखोरी कधीच झाली नसती.
भाषेचा प्रभाव
तसंच भारतात ऊर्दू भाषेचं प्रमाणही लक्षणिय राहिलं असतं त्यामुळं हिंदी भाषेचा प्रभाव कमी राहिला असता आणि सरकारी कामकाजात इंग्रजी भाषेचा प्रभाव अधिक असता.
क्रिकेट टीम
भारत-पाकिस्तानच्या दोन क्रिकेट टीम नसत्या. उलट सचिन तेंडुलकर, शोएब अख्तर, विराट कोहली, बाबर आझम हे एकाच भारताच्या टीममध्ये खेळताना दिसले असते.
तालिबानचा उदय
अखंड भारतात जिओपॉलिटिक्सचा विषय मजेशीर असता. कारण १९७०च्या दशकात रशियाविरोधात अमेरिकेनं पाकिस्तानला हाताशी धरुन अफगाणिस्तानात दहशतवादी निपजले नसते, म्हणजेच तालिबानींचा उदयच झाला नसता.
काश्मीरी पंडीत
त्याचबरोबर काश्मीरचा मुद्दाच संपून गेला असता, तिथं वारंवार होणारे दहशतवादी हल्लेच झाले नसते, काश्मीरी पंडितांना विस्थापित व्हावं लागलं नसतं, भारतीय जवानांचे प्राण गेले नसते.
विकास
सध्या पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश संरक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत, ती झाली नसती आणि देशाचे ७ लाख करोडो रुपये वाचले असते. त्याचा फायदा अखंड भारताच्या विकासासाठी झाला असता.
आंतरराष्ट्रीय हद्द
भारताची आंतरराष्ट्र हद्द ही अफगाणिस्तान, इराणपर्यंत गेली असती. चीन शेजारचा देश असला तरी तो भारताची अवाढव्य ताकद पाहून नमून राहिला असता.
जीवनमान
अखंड भारतात सध्या पाकिस्तानात राहणाऱ्या लोकांचं जीवनमान खूप सुधारलं असतं. तसंच पाकिस्तानातील आर्थिक, राजकीय अन् सांस्कृतीक स्थिती अधिक भक्कम बनली असती.
धर्मनिरपेक्ष देश
अखंड भारत हा धर्मनिरपेक्ष देश असता तसंच पाकिस्तानवरुन राजकारण्यांचं सुरु असलेलं धार्मिक ध्रुविकरण, प्रोपोगंडा आणि कट-कारस्थानं झाली नसती, तर अफगाणिस्तान किंवा इराणविरोधात मोहिम सुरु झाली असती.
मुद्द्यांवर चर्चा
उलट यामुळं राजकारण्यांना धार्मिक धृविकरणाऐवजी नागरिकांच्या समस्यांवर जास्त चर्चा करावी लागली असती, जे अखंड भारतासाठी खूपच हिताचं झालं असतं.
आर्थिक पॉवर
अखंड भारतात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक आली असती आणि त्यामुळं देशाची आर्थिक पॉवर वाढली असती. अखंड भारत हा अमेरिका आणि चीनच्या तोडीचा बनला असता.