इंडियन वॉर्मिंग म्हणजे काय? त्याचा भारतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या...

Vrushal Karmarkar

भारतीय तापमानवाढ

'भारतीय तापमानवाढ' ही संज्ञा तुम्हाला नवीन वाटू शकते, पण ती अजिबात नवीन नाही. तुम्ही याला जागतिक तापमानवाढीचे अधिक धोकादायक स्वरूप म्हणू शकता.

global warming in India

|

ESakal

जागतिक संकट

भारतातील झपाट्याने वाढणारे तापमान हे एक गंभीर जागतिक संकट बनले आहे, जे मानवी जीवन, शेती आणि निसर्गाच्या अस्तित्वालाच आव्हान देत आहे.

global warming in India

|

ESakal

जागतिक हवामान

जागतिक हवामान आणि हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था AQI.in च्या एका ताज्या अहवालाने जगाला हादरवून सोडले आहे.

global warming in India

|

ESakal

हवामान अहवाल

या थेट हवामान अहवालानुसार, जगातील १०० सर्वात उष्ण शहरांच्या यादीत एकट्या भारतातील ९७ शहरांचा समावेश आहे

global warming in India

|

ESakal

भयावह वास्तव

ही आकडेवारी दर्शवते की, भारतीय तापमानवाढ आता भविष्यासाठीचा इशारा राहिलेली नाही, तर वर्तमानातील एक भयावह वास्तव आहे.

global warming in India

|

ESakal

इंडियन वॉर्मिंग

जागतिक तापमानवाढीमुळे भारतीय उपखंडात तापमान वाढण्याच्या आणि हवामान पूर्णपणे बदलण्याच्या प्रक्रियेला 'इंडियन वॉर्मिंग' म्हटले जात आहे.

global warming in India

|

ESakal

तापमान

भारतातील अनेक राज्यांमध्ये सूर्य आग ओकत आहे. ओडिशातील बलांगीर आणि बिहारमधील सासाराम ही ४८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानासह जगातील सर्वात उष्ण ठिकाणे म्हणून समोर आली.

global warming in India

|

ESakal

तीव्र उष्णता

तर उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ४७ अंश सेल्सिअस तापमानाची तीव्र उष्णता आहे. यासोबतच, तीव्र उष्णतेमुळे देशभरात उष्माघात, निर्जलीकरण आणि अवयव निकामी होण्याचा धोका शिगेला पोहोचला आहे.

global warming in India

|

ESakal

पातळी

वाढत्या तीव्र उष्णतेमुळे नद्या, तलाव आणि भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. याशिवाय, वातानुकूलित यंत्रे आणि शीतकरण उपकरणांच्या अतिवापरामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे.

global warming in India

|

ESakal

परिणाम

याशिवाय, दिवसाच्या उच्च तापमानामुळे बांधकाम, शेती आणि घराबाहेरील मजुरीची कामे पूर्णपणे थांबत आहेत. ज्यामुळे देशाच्या उत्पादकतेवर थेट परिणाम होत आहे.

global warming in India

|

ESakal