Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांसाठी अटळ प्रेरणास्त्रोत आहेत.
त्यांनी अनेक थोर पराक्रम गाजवले आणि त्यांचे आरोग्यही उत्तम होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? या प्रश्नावर अनेक तर्क-वितर्क मांडले गेले आहेत आणि वेगवेगळी मते व्यक्त झाली आहेत.
या संदर्भात नेमकं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, अनेक लेखकांनी यावर लेखन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आहार आणि युद्ध यांच्यातील निकटचा संबंध स्पष्टपणे ओळखला होता.
लढाई करायची असेल, तर योग्य आहार घेणे तितकेच आवश्यक आहे.
सैन्याच्या आहाराबरोबरच ते स्वतःच्या आहाराबाबतही अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर होते.
महाराजांच्या आहारात ज्वारी, बाजरी आणि नाचणीच्या भाकरीसोबतच दूध, लोणी, दही आणि तुपाचा समावेश होता.
मोहिमेवर असताना केळीही मोठ्या प्रमाणात बरोबर नेली जात असत.
त्या काळात सैन्याच्या उपयोगासाठीही या गोष्टी वापरल्या जात असतील.
इतिहासकार इंग्रजीत सावंत यांनीही महाराजांच्या आहाराविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या
शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत सापडले तेव्हा ते तिथं सुकामेवा खात होते आणि एक वेळ जेवत होते
इतिहासकार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा मासांहाराला विरोध नव्हता, याचे अनेक उदाहरण देखील आहेत.
शिवाजी महाराजांचा मांसाहाराला विरोध नव्हता याचं उत्तम उदाहरण सावंत यांनी दिलं आहे.
मात्र शिवाजी महाराजांच्या आहारात मांसाहार होते की नाही याची लेखी नोंद कुठेही आढळत नाही