Sandip Kapde
६ जून १६७४ छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात झाला, त्यापूर्वी अनेक विधी करण्यात आले
३० मे शनिवार रोजी शिवाजी महाराजांचे समंत्रक विवाह पार पडले.
त्याच्या आधी, २९ मे रोजी त्यांची मुंज विधी झाली होती.
या कारणामुळे पूर्वीचे विवाह धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून अमान्य ठरले.
म्हणूनच शिवाजी महाराजांना ३० तारखेला पत्नीसोबत पुन्हा विवाह करावा लागला.
रायगडावर हा विधी पार पडताना इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन उपस्थित होता.
ऑक्झिंडेनला या विधीचा धार्मिक आणि पारंपरिक अर्थ समजला नाही.
त्यामुळे त्याने आपल्या रोजनिशीत चुकीची नोंद केली.
त्याच्या लेखनात राज्याभिषेकाआधीच शिवाजी महाराजांनी विवाह केला असल्याचे म्हटले आहे.
हेन्रीच्या या नोंदीमुळे अनेक इतिहासकार भ्रमित झाले.
समंत्रक विवाहावेळी सोयराबाई यांना पट्टराणीचा मान देण्यात आला.
या विधीमुळे धर्मशास्त्रात सांगितलेले सर्व अधिकार मिळाले.
त्यामुळे शिवाजी महाराज व सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी आवश्यक असलेले सर्व धार्मिक हक्क प्राप्त झाले.
समंत्रक विवाह हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा विधी होता.
या विवाहामुळे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक अधिक विधिवत आणि शुद्ध पद्धतीने पार पडू शकल्याचे 'छत्रपती शिवाजी महाराज' पुस्तकात म्हटले आहे.