Mansi Khambe
दररोज आपण रस्त्यांवर ट्रॅफिक सिग्नल पाहतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल कुठे बसवला गेला? तो कसा सुरू झाला असावा?
तर याची एक ह्रदयद्रावक कथा आहे. ट्रॅफिक सिग्नल अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल सुमारे १५० वर्षांपूर्वी ९ डिसेंबर १८६८ रोजी लंडन, इंग्लंड येथे बसवण्यात आला होता. या सिग्नलला ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या अगदी शेजारी, ग्रेट जॉर्ज स्ट्रीट आणि ब्रिज स्ट्रीटच्या चौकात स्थापित करण्यात आले होते.
याचे श्रेय जॉन पीक नाईट यांना जाते. जे रेल्वे सिग्नल अभियंता होते. ज्यांना रेल्वेवरील सिग्नलिंग सिस्टमचा बराच अनुभव होता. त्यांनी या अनुभवाचा वापर रस्त्यांवरील वाढत्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला.
त्या काळासाठी हा सिग्नल खूपच वेगळा होता. तो एक गॅस-लॅम्प सिग्नल होता. ज्यामध्ये रेल्वे सिग्नलसारखे लाल आणि हिरव्या रंगाचे सेमाफोर हात होते.
दिवसा वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस या यांत्रिक हातांचा वापर करत असत. त्याच वेळी, रात्रीच्या अंधारात दूरवरून ते दृश्यमान व्हावे म्हणून त्यात गॅस दिवा लावला जात असे. जेणेकरून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सिग्नल स्पष्टपणे दिसू शकतील.
ही संपूर्ण व्यवस्था एका पोलिसाने मॅन्युअली चालवली होती. जो वाहतुकीच्या परिस्थितीनुसार हे हात आणि दिवे बदलत असे. मात्र या क्रांतिकारी शोधाचे आयुष्य कमी आणि दुःखद होते.
त्याच्या स्थापनेनंतर काही महिन्यांनी जानेवारी १८६९ मध्ये, एक भयानक अपघात झाला. सिग्नलमध्ये गॅस गळतीमुळे मोठा स्फोट झाला. ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरला.
सिग्नलजवळ कर्तव्यावर असलेल्या एका पोलिसाचा या दुःखद घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर, हा पहिला वाहतूक सिग्नल ताबडतोब काढून टाकण्यात आला. त्यानंतर अनेक वर्षे पुन्हा रस्त्यावर कोणताही सिग्नल बसवण्याचे धाडस झाले नाही.
यामुळे शहरांमध्ये वाहतूक नियंत्रणाचा विकास काही काळासाठी थांबला. गॅस-लॅम्प सिग्नलच्या बिघाडानंतर, सुरक्षित आणि प्रभावी वाहतूक नियंत्रणाची आवश्यकता कायम राहिली.
त्यानंतर सुमारे ५० वर्षांनी म्हणजे अर्ध्या शतकानंतर, ५ ऑगस्ट १९१४ रोजी, अमेरिकेतील क्लीव्हलँड येथे जगातील पहिला इलेक्ट्रिक वाहतूक सिग्नल बसवण्यात आला.
या सिग्नलवर लाल आणि हिरव्या दिव्यांचा वापर केला जात असे. वाहतूक पोलीस अधिकाऱ्याद्वारे नियंत्रित केले जात असे. हळूहळू हे इलेक्ट्रिक सिग्नल जगभर पसरू लागले.
ज्यामुळे रस्त्यांवरील सुरक्षा आणि सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली. भारतातील पहिला वाहतूक सिग्नल १९५० च्या दशकात कोलकाता येथे बसवण्यात आला. ज्यामुळे देशात आधुनिक वाहतूक व्यवस्थापनाची सुरुवात झाली.