Pranali Kodre
भारतात ज्या मुख्य देशांतर्गत स्पर्धा होतात, त्यातील एक स्पर्धा म्हणजे विजय हजारे ट्रॉफी. वनडे प्रकाराक ही स्पर्धा खेळली जाते.
२००२ मध्ये विजय हजारे यांचे नाव भारताच्या देशांतर्गत वनडे स्पर्धेला देण्यात आले. पण या स्पर्धेला ज्यांचं नाव दिलं गेलं आहे, ते विजय हजारे कोण होते माहित आहे का?
११ मार्च १९१५ मध्ये महाराष्ट्रातील सांगली येथे जन्म झालेल्या विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटमध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
विजय हजारे यांनी ३० कसोटी सामने भारताकडून खेळले, ज्यात ४७.६५ च्या सरासरीने ७ शतकांसह २१९२ धावा केल्या. त्यांनी १४ सामन्यात भारताचे नेतृत्वही केले.२
त्यांनी २३८ प्रथम श्रेणी सामने खेळताना ६० शतके आणि ७३ अर्धशतकांसह ५८.३८ च्या सरासरीने १८७४० धावा केल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वोच्च सरासरी असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये सध्या ते टॉप १० खेळाडूंमध्येही आहेत. तसेच सर्वाधिक शतके करणाऱ्यांमध्येही ते पहिल्या १० मध्ये ते आहेत.
त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० द्विशतकेही केली, ज्यातील ६ त्यांनी दुसरं महायुद्ध सुरू असताना ठोकली होकी. विशेष म्हणजे दुसऱ्या महायुद्धावेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय क्रिकेट खेळणारा भारत एकमेव देश होता.
विजय हजारे यांनी केवळ फलंदाजीतच नाही, तर गोलंदाजीतही छाप पाडली आहे. त्यांनी ब्रॅडमन यांनाही बाद केलं आहे. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५९५ विकेट्स घेतल्या.
त्यांना १९६० मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले.