शहरांची नावे बदलल्यानंतरही उच्च न्यायालयाचे नाव का बदलत नाही? जाणून घ्या कारण...

Vrushal Karmarkar

भाजप सरकार

भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. वेळोवेळी नावे बदलण्याची परंपरा पूर्वीच्या सरकारांनीही चालू ठेवली आहे.

High Court Name | ESakal

उच्च न्यायालय

या नामकरण परंपरेत काही शहरांचाही समावेश आहे जिथे उच्च न्यायालय आहे. जसे अलाहाबादमधील अलाहाबाद उच्च न्यायालय.

High Court Name | ESakal

प्रयागराज

जरी या शहराचे नाव प्रयागराज असे बदलले असले तरी, उच्च न्यायालयाचे नाव अजूनही अलाहाबाद आहे.

High Court Name | ESakal

उच्च न्यायालयाचे नाव

त्याचप्रमाणे मुंबईत बॉम्बे उच्च न्यायालय, चेन्नईमध्ये मद्रास उच्च न्यायालय. आता प्रश्न असा उद्भवतो की शहराचे नाव बदलल्यानंतरही उच्च न्यायालयाचे नाव का बदलले जात नाही?

High Court Name | ESakal

जुन्या नावाने कार्यरत

देशात अशी अनेक उच्च न्यायालये आहेत ज्यांच्या शहरांची नावे बदलली आहेत. परंतु उच्च न्यायालये अजूनही जुन्या नावाने कार्यरत आहेत. जसे की बॉम्बे, मद्रास, कलकत्ता किंवा अलाहाबाद उच्च न्यायालय.

High Court Name | ESakal

नाव बदलण्याचा नियम

प्रत्यक्षात, उच्च न्यायालयाचे नाव बदलण्याचा नियम आहे. यासाठी राज्य सरकारने एक प्रस्ताव आणावा लागतो. जो विधानसभेच्या टेबलावर ठेवला जातो.

High Court Name | ESakal

शिफारस

यानंतरही, नाव बदलण्यासाठी संबंधित उच्च न्यायालयांची शिफारस आवश्यक असते.

High Court Name | ESakal

बॉम्बे

१९९५ मध्ये बॉम्बेचे नाव बदलून मुंबई, १९९६ मध्ये मद्रासचे नाव बदलून चेन्नई आणि २००१ मध्ये कलकत्त्याचे नाव कोलकाता असे ठेवण्यात आले.

High Court Name | ESakal

विधेयक

२०१६ मध्ये सरकारने बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता उच्च न्यायालयांची नावे बदलण्यासाठी एक विधेयक आणले होते. परंतु संबंधित उच्च न्यायालये आणि राज्यांच्या आक्षेपानंतर ते संसदेत मांडता आले नाही.

High Court Name | ESakal

भारतात पहिले पोस्ट ऑफिस कधी उघडले? २५१ वर्षांपूर्वींचा 'तो' इतिहास काय?

first post office | ESakal
वाचा सविस्तर