‘एनसीएलटी’च्या मदतीने ८० हजार कोटींची वसुली’

NCLT
NCLT

नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) निकाली काढलेल्या ६६ प्रकरणांमुळे बॅंकांची सुमारे ८० हजार कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ‘एनसीएलटी’च्या मदतीने मार्चपर्यंत आणखी ७० हजार कोटी रुपयांची कर्जे वसूल होतील, अशी शक्‍यताही जेटली यांनी व्यक्त केली आहे.

एनसीएलटीमध्ये व्यवसायिक दिवाळखोरीची आतापर्यंत १,३२२ प्रकरणे दाखल झाली असून, सुमारे ४,४५३ प्रकरणांचा सुनावणीपूर्वीच निपटारा झाला आहे. ६६ प्रकरणे पूर्णपणे निकाली काढली. तिथेच २६० प्रकरणांत ‘एनसीएलटी’ने मालमत्ता विकून कर्जवसुलीचे आदेश दिल्याचे जेटली यांनी सांगितले. भूषण पॉवर ॲण्ड स्टील, एस्सार स्टील इंडिया अशा १२ मोठ्या प्रकरणांवरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, चालू आर्थिक वर्षातच त्यासंबंधी निर्णय होईल, असेही जेटली यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com