कामाचे स्वातंत्र्य मिळाले नाही: सायरस मिस्त्री

Cyrus Mistry
Cyrus Mistry

मुंबई - टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी आज (बुधवार) एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले आहे. 

कॉर्पोरेट विश्‍वाच्या एकंदर इतिहासामध्ये या निर्णयासारखा दुसरा निर्णय सापडणे शक्‍य नसल्याची भावना व्यक्त करत मिस्त्री यांनी यासंदर्भात बोर्डावर टीका केली. याचबरोबर, बोर्डाची काम करण्याची पद्धत ही "चुकीची व बेकायदेशीर‘ असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. मिस्त्री यांनी यावेळी बोर्डाकडून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले नसल्याचा आरोप केला. 

"अध्यक्षास कोणत्याही बचावाची संधी न देता अशा प्रकारे काढून टाकण्याची ही घटना कॉर्पोरेट विश्‍वाच्या इतिहासामधील एकमेव घटना असावी. बोर्डाच्या या कृतीमुळे टाटा समुहाच्या प्रतिष्ठेचे अमाप नुकसान झाले आहे. समुहामध्ये कॉर्पोरेट शासनव्यवस्थेचा असलेला पूर्ण अभाव आणि टाटा उद्योगसमूहामधील भागधारकांप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्यामध्ये संचालकांना येत असलेले अपयश अधोरेखित करण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे,‘‘ असे मिस्त्री म्हणाले. 

टाटा समूहाची मालकी असलेल्या टाटा सन्सच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत मिस्त्री यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळात झालेल्या बैठकीत सहा जणांनी मिस्त्री यांची हकालपट्टी करण्याच्या बाजूने मतदान केले होते तर दोघे तटस्थ राहिले होते. याच बैठकीत टाटा यांची हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com