कलम 370च्या निर्णयानंतर मनसेकडून अदानी, अंबानींचे अभिनंदन

कलम 370च्या निर्णयानंतर मनसेकडून अदानी, अंबानींचे अभिनंदन

मुंबई: देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज (सोमवार) राज्यसभेत जम्मू-काश्मीरला लागू असलेले घटनेचे कलम 370 हटवण्याची शिफारस मांडली. शिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. सोशल नेटवर्किंगवरुन काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे स्वागत करत देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस राजू पाटील यांनी या निर्णयानंतर अदानी आणि अंबानींचे अभिनंदन केले आहे.

कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर राज्याची पुनर्रचना होणार, राज्याचे विभाजन करण्यात येणार आहे. त्यामुळे आता भारतीयांना जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे. मात्र राजू पाटील यांनी फेसबुकवर कलम 370 संदर्भात एक खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये उद्योगपती अदानी आणि अंबानींचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, ‘तुर्तास अदानी अंबानींचे अभिनंदन! बाकीच्यांचे सकारात्मक परिणाम आल्यावरच! जय हिंद!’

अदानी आणि अंबानींसारख्या उद्योगपतींचे अभिनंदन कशासाठी? 

कलम 370 रद्द झाल्यास जम्मू-काश्मीरला देण्यात येणारा विशेष दर्जा संपुष्टात येणार आहे. शिवाय त्यामध्ये असलेला 35 अ कलमही रद्द होईल. या कलमानुसार इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करू शकत नव्हता. त्यामुळे आता हा कलम रद्द झाल्यास ही अट रद्द होईल. भारतीय नागरिकांना थेट आता जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करता येणार आहे. मोदी सरकारचे जवळचे संबंध असलेले अंबानी आणि अदानी आता लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये मालमत्ता खरेदी करतील असे म्हणत त्यांना लक्ष्य करण्यात आले. सोशल नेटवर्किंगवर सध्या अनेक यासंदर्भात विनोद व्हायरल होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com