अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली : या सरकारने बांधकाम क्षेत्रात रेरा कायद्यामुळे बेनामी संपत्ती बाळगणाऱ्यांवर निर्बंध आणले. मनरेगासाठी मोठ्या प्रमाणात वित्त सहाय्य करण्यात आले, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्पात सांगितले सांगितले.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी खर्च केले गेले. प्रधानमंत्री आवास योजनेतून 1 कोटी 53 लाख घरांची निर्मिती करण्यात आली. तसेच सौभाग्य योजनेमुळे आम्ही प्रत्येक घरात वीजेचेजोडणी दिली आहे. या सरकारने 143 कोटी एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले.
2021 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोचविण्याची आमचा मनास आहे. यामुळे गरिब कुटुंबांचे 50 हजार कोटी वाचणार आहेत. स्वस्त धान्यासाठी 1 लाख 70 कोटी रुपयांची तरतूद आयुषमान भारत योजनेद्वारे आतापर्यंत 10 लाख नागरिकांवर उपचार करण्यात आले आहे. यामुळे गरिब कुटुंबाचे तीन हजार कोटी रुपये वाचले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.