सरकारचा आरबीआयकडून 3.6 लाख कोटी मिळवण्याचा इरादा नाही: आर्थिक व्यवहार सचिव

सरकारचा आरबीआयकडून 3.6 लाख कोटी मिळवण्याचा इरादा नाही: आर्थिक व्यवहार सचिव

नवी दिल्ली:  केंद्र सरकारचा रिझर्व्ह बॅंकेकडून 3.6 लाख कोटी रुपये मिळवण्याचा कोणताही इरादा नसल्याचे मत आर्थिक व्यवहार सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची अर्थव्यवस्थेतील भूमिका स्पष्ट करण्यासाठी चर्चा करण्याची सरकारची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. माध्यमांमधून यासंदर्भात चूकीच्या बातम्या येत आहेत. सरकारची आर्थिक गाडी रुळावर आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून 3.6 लाख कोटी रुपये घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे सुभाष चंद्र गर्ग यांनी स्पष्ट केले. 

रिझर्व्ह बॅंकेची आर्थिक चौकटीतील भूमिका निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे. सरकारने वित्तीय तूटीसंदर्भात 31 मार्च 2019 पर्यत 3.3 टक्क्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकार त्याचा पाठपुरावा करणार आहे. 2013-14 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.1 टक्के होती. त्यानंतर 2014-15 पासून सरकारला वित्तीय तूट कमी करण्यात यश आले आहे. चालू आर्थिक वर्ष संपेपर्यत वित्तीय तूट 3.3 टक्क्यांवर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मत सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com