काश्मीरमधील घडामोडींचे शेअर बाजारावर पडसाद

काश्मीरमधील घडामोडींचे शेअर बाजारावर पडसाद

नवी दिल्ली: मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या प्रस्ताव ठेवल्यानंतर त्याचे पडसाद शेअर बाजारातही उमटले आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजार 650 अंशांनी घसरला होता. सध्या (दुपारी 2 वाजता) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 532.64 अंशांच्या घसरणीसह 36 हजार 585.58 अंशावर  व्यवहार करतो आहे.. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकात 157 अंशांची घसरण झाली आहे.  तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकात 157 अंशांची घसरण झाली आहे. मात्र देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषाणानंतर बाजार सावरला.  

संसदेमध्ये सुरु असलेल्या काश्मीरमधील घडामोडींचा परिणाम शेअर बाजारात झाला आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात सतत घसरण सुरु आहे. शिवाय आता आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. 

सध्या मुंबई शेअर बाजारात भरती एअरटेल, टीसीएस, टेक महिंद्रा, बजाज ऑटो आणि कोल इंडिया यांचे शेअर सर्वाधिक वधारले आहे. तर येसबँक, पॉवरग्रिड, टाटा मोटर्स आणि हिंडाल्को यांच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com