दूरसंचार कंपन्यांमध्ये आता दरवाढीचे युद्ध 

jio
jio

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांना महसूल शुल्क आणि त्यावरील दंडापोटी एकत्रितरीत्या ९० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहे. व्यवसायात आणि स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांनी मोबाईल शुल्कात वाढ केली आहे.  रिलायन्स जिओनेदेखील मोबाईल शुल्कात ३९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे.

नव्या दरांची अंमलबजावणी येत्या शुक्रवारपासून केली जाणार आहे. व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेलपाठोपाठ दरवाढ करण्याचे संकेत जिओने दिले होते. मात्र, इतर स्पर्धकांच्या तुलनेत जिओचे दर २५ टक्‍क्‍यांपर्यंत कमी असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. व्होडाफोन आयडिया आणि भारती एअरटेलने मंगळवारपासूनच आपली दरवाढ लागू केली आहे. या कंपन्यांनी जवळपास ५० टक्‍क्‍यांपर्यंत आपल्या विविध योजनांवरील मोबाईल शुल्क वाढवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com