हुस्स सुटले बै

girl
girl

कॉलेजात मस्त पोरी पोरांना बोलत्यात भेटत्यात. बसल्यावर सगळ्या गप्पा मारताना सांगतात पण की आमचं असं आमचं तसं. आपण मात्र मन मारून पुस्तकाच्या बाहेर डोकं काढायच नाही. घरून निघालं की सरळ खाली मान घालून नाकाच्या शेंड्याकड पाहून चालायचं. किती दिवस झालेत गावातला वैभव पाठीमाग लागलाय. गावात ह्याच्या हुशारीच्या चर्चा सुरू असतात. मनात हजारदा वाटतं की बोलावं त्याला. 

कमीत कमी त्याला विचारावं इतकं का पाहतोस डोळे भरून ? बसावं त्याच्या सहज बाजूला समजून घ्यावं त्याला एकदा. की नकोस रे बाबा माझ्या पाठीमागे फिरू मला मनच नाही. असतं मन मला तर फुटला असता माझ्या मनाला पाझर नक्कीच. पण मी तरी काय करू शिकायचं आहे थोडं तालुक्या जिल्ह्या बाहेर पण जग आहे ते अनुभवून पाहायचं आहे. जगायचं आहे रे मला मनमुराद पणाने असलेल्या स्वप्नांच्या भोवती. वाटतं त्यात तू सुद्धा असावं. पण हे मात्र अशक्य आहे कारण घरात रोज दडपण घातलं जातंय की काही कानावर आलं तर तुझी धडगत नाही. शिक्षण तर बंद होईलच पण आठ दिवसाच्या आत ऊसतोड करणाराला देईल. बस आयुष्यभर ऊस तोडत.

सहज भानावर आले तर लक्षात आलं की घरी कधी आले ते समजलं च नाही मला. घरी सगळे चहा पीत बसलेली. मी पायातली चप्पल काढली आणि घरात गेले चुलीवर चहा चं भांड ठेवलेलं; चहा ला उकळी आलेली. आतल्या खोलीत गेले दप्तर भीतीवर च्या खिळ्याला लटकावलं. कपडे बदललेले आणि बाहेर येऊन बसले. तर सगळे आले तेंव्हा हसत असलेली गंभीर होऊन माझ्याकडं पाहू लागली. 

चहाच्या बशीत आज्जीने चहा वाटला फुररर करत घटा-घट करत घोटल्या बराबर बोलली मग काय इचार हे लग्नाचा ? पाव्हने ईचारीत होते कधी येऊत पोरगी पाहायला म्हणून. 
मी आपली गप्प. हातात माझ्या चहा चा कप थर थर कापत होता. मला कळेना काय बोलावं ते. तेव्हड्यात आज्जी म्हणाली बायकांची बुद्धी किती ? आपरी ती आपरी च काही केलं तरी. तेवढ्यात शेजारी बसलेला छोट्या बोलला की आज्जी तू पण बयांत च मोडत आशील. म्हणाल्या बराबर आज्जी वसकत म्हणाली की डोल्या शहण्यात कशाला तोंड खुपसतोस.
लंय शहाणा झालास का ? 
आमचे केस आशेचा पांढरे झालेत का ?
असं म्हणत डबीत ठेवलेली तंबाखू काढून मळत बोलत होती.

मी बोलले की कमीत कमी आजून चार दोन वर्षे तरी शिकून द्या मला. बाकी काही म्हणणं नाही माझं तुम्ही म्हणाल त्या मुला बरोबर मी करील लग्न. फक्त चार दोन वर्षे थांबा. 

तेव्हड्यात आबा बोलले की शिकायचं तर शिक पण नीट. पण एक अटीवर तुला चांगले मार्क घेऊन फकस्त फुकट शिक्षण करावं लागेल. मला अजिबात ताण व्हायला नको तुझ्या शिक्षणाचा. कारण लग्नाला लाख दोन लाख मला हुंडा द्यावा लागेल. भांडे चार लोकांत उठून दिसेल असलं लग्न पण थाटा-मटात लग्न करावं लागेल.

मी चहा च्या बश्या-कप आणि चहा चं भांड उचललं आणि घेऊन घासायला सुटले बै लग्नाच्या तावडीतून पुढचं पुढं पाहू म्हणत उठून भांडे घासायला निघाले..!

समाप्त..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com