कोरेगाव भीमा घटना आणि बोध

KORE GAON BHIMA violence
KORE GAON BHIMA violence

कोरेगाव भीमा येथे घडलेला प्रसंग आणि त्यामुळे महाराष्ट्रभर घडलेला प्रकार हा आपणास अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. एखादी घटना आणि त्यामुळे समाजातील काही लोकांमधे जर तेढ निर्माण होत असेल तर अशा घटनांना आपण किती खतपाणी घालायचे हे आपण ठरवायला पाहिजे. समाज माध्यमातून फोटो व्हीडीओ किंवा घटनेची माहिती प्रसारित करताना आपण विचार केला पाहिजे. एखाद्या अन्यायकारक घटनेचा निषेध जरूर करावा पण त्यामुळे आपल्या समाजात दूही माजेल असे नक्कीच करू नये. राजकारणी लोकांना तेच पाहिजे. त्यासाठी अशा घटना घडवल्या आणि चिघळवल्या जातात. यात डोकी फुटतात रक्त सांडते आर्थिक नुकसान होते ते सर्व कधी काळी आपले भाऊबंध, मित्र, शेजारी असतात. अन्यायकारक घटनांविरूद्ध लढा जरूर लढावा पण कायदा हातात घेऊ नये. आपण कायदा हातात घ्यावा आग लागावी आणि आपण त्यावर आपली पोळी भाजून घ्यावी हा एकमेव उद्देश समाज कंटकांचा असतो. अशांना बळी पडू नका सारासार विचार करा विचारांची लढाई विचारांनी लढावी आणि अन्यायाविरूद्ध कायद्याची लढाई लढावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com