रांची - एकदिवसीय क्रिकेटमध्ये "फिनिशर' ही जबाबदारी जेवढी कठीण आहे, तेवढेच परिपूर्ण "फिनिशिर' सापडणे कठीण असल्याचे मत भारताचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले.
घरच्या मैदानावर धोनीला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. तो म्हणाला, ""एकदिवसीय क्रिकेटमध्ये अलीकडे "फिनिशर'च्या भूमिकेला खूप महत्त्व येऊ लागले आहे. त्यामुळे 5, 6 काय किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे तेवढे सोपे राहिलेले नाही. अशा क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला विजयापर्यंत नेऊ शकणारा परिपूर्ण खेळाडू आपल्याला अलीकडच्या काळात गवसलेला नाही.'' न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ 261 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 128 अशा चांगल्या स्थितीतून गडबडला. डावाच्या शेवटी अक्षर पटेल (38) आणि अमित मिश्रा (14) यांनी आशा पल्लवित केल्या होत्या. पण, त्यांची भागीदारी भारताला विजयापर्यंत नेऊ शकली नाही.
धोनीने संघातील नवोदित खेळाडूंना "लक्ष्य' केले. तो म्हणाला, ""अशा संथ झालेल्या खेळपट्टीवर आव्हानाचा पाठलाग करणे नेहमीच कठीण असते. सध्या दोन्ही बाजूने स्वतंत्र चेंडू वापरले जात असल्यामुळे हे आव्हान अधिक कठीण झाले आहे. त्यात प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा मार अचूक टप्प्यावर असेल, तर हेच आव्हान आणखी कठीण होते. त्यामुळे नवोदित खेळाडूंनी परिस्थितीचे झटकन अवलोकन करणे गरजेचे आहे.'' जेव्हा एखादी भागीदारी होत असते, तेव्हा सगळे सुरळीत असते. पण, ही भागीदारी तुटली की तुमच्यावरील दडपण वाढते आणि चौथ्या सामन्यात नेमके हेच घडल्याचे धोनीने मान्य केले.
भारतीय संघाचा विजय हा केवळ विराट कोहलीवर अवलंबून आहे का, असे विचारल्यावर धोनी म्हणाला, ""नाही, मला नाही तसे वाटत. एखाद्या खेळाडूची आकडेवारी बघून असे निष्कर्ष काढले जाऊ नयेत. प्रत्येक सामन्यात आम्ही चांगला खेळ केला आहे.
धोनी म्हणतो...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.