15 भारतीय एव्हरेस्टवर अडकले, स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी

sushma-swaraj
sushma-swaraj

काठमांडू : गिर्यारोहणासाठी गेलेले 15 भारतीय एव्हरेस्ट शिखरावर अडकले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा यांच्याकडे ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली आहे. सुषमा स्वराज यांनीही या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या. नेपाळमधील भारतीय दुतावासातील अधिकारी मनजीव सिंह पुरी यांच्याशी संपर्क साधून या घटनेकडे तातडीने लक्ष देण्यास सांगितले. "आम्ही 15 भारतीय लुकलाममध्ये अडकलो आहोत. आम्हाला मदतीची गरज आहे. स्थानिक दुतावासापासून आम्हाला कसलीही मदत मिळू शकलेली नाही." अशा प्रकारचे ट्टिवर अमित थढानी या गिर्यारोहकाने शनिवारी परराष्ट्र मंत्रालय व सुषमा स्वराज यांच्या ट्विटर हॅंडेलला टॅक केले होते.

याची दखल घेऊन स्वराज यांनी तातडीने पावले उचचली आहेत.
एव्हरेस्ट भागातील हवामान मागील काही दिवसांपासून खराब झाले आहे. त्यामुळे सर्व विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. हे भारतीय मागील तिन दिवसांपासून एव्हरेस्टवर अडकले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com