मुंबई हल्ला खटला; कोर्टाची सरकारला नोटीस
लाहोर : मुंबई हल्ला खटल्याप्रकरणी रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्रालयाला नोटीस बजावून 24 भारतीय साक्षीदारांना हजर करण्यासंदर्भातील उत्तर आठवड्याच्या आत द्यावे, असे म्हटले आहे.
मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यास दहा वर्षे होत असून आतापर्यंत पाकिस्तानातील एकाही आरोपीला याप्रकरणी शिक्षा झालेली नाही. यावरूनच पाकिस्तान मुंबई हल्ला खटला चालवण्याबाबत किती उदासीन आहे, हे कळते. रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने अदिआला जेल (रावळपिंडी) येथे काल या खटल्याची सुनावणी केली. या वेळी पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाला नोटीस बजावून भारतीय साक्षीदारांना हजर करण्याबाबतचे उत्तर 5 जुलैच्या आत द्यावे, असे म्हटले आहे. मात्र सरकारी वकिलाने भारतीय नागरिकांना पाकिस्तानात पाठवण्याबाबत भारत सरकार अनुत्सुक असल्याचे न्यायालयाला सांगितले. या खटल्याची पुढील सुनावणी 5 जुलैला होणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.