धुक्यामुळे झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

धुक्यामुळे झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली- हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हरयाणातील अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी (29 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे. याआधीही हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी (24 डिसेंबर) सकाळी हा अपघात झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com