श्रेयासाठी भाजपचा आटापिटा

Aadhar-Card
Aadhar-Card

‘आधार’बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे वर्णन ‘गरिबोन्मुख सरकारचा मोठा विजय’ असे करून भाजपने याचे श्रेय घेण्याचा आटापिटा केल्याचे स्पष्ट झाले. पक्षनेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, की ‘आधार’बाबतचा निर्णय हा देशाची लोकशाही मजबूत करण्याची सुवर्णसंधी असून, ती साधली पाहिजे. 

‘आधार’बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या घटनापीठाने चार विरुद्ध एक अशा बहुमताने निकाल दिला. त्यानंतर भाजपने याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करताना न्या. धनंजय चंद्रचूड यांनी उपस्थित केलेल्या साधार शंकांनाही परस्पर उत्तरे देण्याची धडपड केली. ‘आधार’ची सक्ती ही भारतीयांच्या खासगीपणाच्या घटनादत्त अधिकारावर आक्रमण करत नाही व त्याचे उल्लंघनही करत नाही, असा दावा सत्तारूढ पक्षाने केला आणि ‘आधार’बाबत वेगवेगळ्या शंका घेणाऱ्या काँग्रेसने आता त्याचे श्रेय घेणे केविलवाणे असल्याचे ताशेरेही ओढले.

प्रसाद म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाचा ‘आधार’बाबतचा निकाल भारतातील शासनतंत्राची पारदर्शकता व पावित्र्य या मुद्द्यांबाबत दूरगामी म्हणून सिद्ध होईल. यामुळे गरिबांच्या कल्याणकारी योजनांचा लाभ आणखी जलद गतीने मिळू शकेल. काँग्रेसला बहुमताचा निकाल मंजूर आहे व हाच पक्ष अल्पमतातील निरीक्षणांच्याही बरोबर आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे. सरकारने वैधानिकता जपून ‘आधार’ची अंमलबजावणी ज्या पद्धतीने केली, त्याचे जागतिक बॅंकेनेही कौतुक केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com