फगवाडा : वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) "आधार'सोबत जोडणे सक्तीचे करण्यात येणार असून, यासाठी सरकारकडून लवकरच कायदा आणला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
अखिल भारतीय विज्ञान परिषदेत ते बोलत होते. सध्या अपघाताला कारणीभूत ठरलेली एखादी व्यक्ती घटनास्थळावरून पसार होत बनावट नावाद्वारे पुन्हा वाहन चालविण्याचा परवाना मिळविते. मात्र, हे परवाने "आधार'शी जोडल्यानंतर याला आळा बसणार आहे. व्यक्तीला स्वतःचे नाव बदलता येत असले तरी, त्याला आपली बायोमॅट्रिक ओळख बदलता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीने परवान्यासाठी नव्याने अर्ज केल्यास ते पटकन लक्षात येणार असल्याचे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या "डिजिटल इंडिया' अभियानाने शहरी व ग्रामीण भाग जोडण्यास मोठा हातभार लावल्याचेही प्रसाद यांनी या वेळी नमूद केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.