आता एअर इंडियाचे होणार खासगीकरण

आता एअर इंडियाचे होणार खासगीकरण

नवी दिल्ली : एअर इंडिया ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याचे समोर आले होते. या आर्थिक संकटानंतर एअर इंडियाचे अखेर खासगीकरण केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी आज (बुधवार) राज्यसभेत दिली. 

एअर इंडिया ही कंपनी मोठ्या आर्थिक संकटात आहे. एअर इंडियावर सुमारे 58, 351 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे आता ही कंपनी चालविणे अशक्य आहे. या कंपनीला 20 विमानांची कमतरता जाणवत असून, कंपनीची स्थिती सुधारण्यासाठी निर्गुंतवणूक करण्याची गरज आहे, असेही पुरी म्हणाले. 

दरम्यान, एका धावपट्टीवरून दर तासाला 45 उड्डाणे होत असतात. मात्र, आता 36 उड्डाणे होत आहेत. विमानतळावर काही अडचणी असून, त्या लवकरच दूर केल्या जातील, असेही पुरी म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com