हुतात्मा औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन जवान ताब्यात

Soldier Aurangzeb
Soldier Aurangzeb

श्रीनगरः राष्ट्रीय रायफल्सचे जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी तीन जवानांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. औरंगजेब यांचे गेल्या वर्षी दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

लष्कराने ताब्यात घेतलेल्या तीन जवानांवर औरंगजेब यांच्या हत्येच्या कटात सामीर असल्याचा आरोप आहे. आबिद वाणी, तज्जमुल अहमद आणि आदिल वाणी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या जवानांची नावे आहेत. औरंगजेब यांच्याबद्दलची माहिती तीन जवान दहशतवाद्यांना देत होते, असा लष्कराला संशय आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या जवानांपैकी दोघे पुलवाम्याचे रहिवासी तर एक जवान कुलगाम जिल्ह्यातील आहे.

औरंगजेब हे गेल्या वर्षी 15 जून रोजी ईद साजरी करण्यासाठी घरी जात होते. ते दक्षिण काश्मीरच्या शोपियानचे रहिवासी होते. घरी जाण्यासाठी लष्करी तळावरुन त्यांनी टॅक्सी पकडली होती. मात्र, दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह पुलवामा जिल्ह्यातील गुस्सू भागात सापडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com