‘कलम-३७१’ला हात लावणार नाही

गुवाहाटी - नॉर्थ-इस्टर्न कौन्सिलच्या (ईशान्येकडील राज्यांची परिषद) खुल्या अधिवेशनात रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सहभागी झाले होते.
गुवाहाटी - नॉर्थ-इस्टर्न कौन्सिलच्या (ईशान्येकडील राज्यांची परिषद) खुल्या अधिवेशनात रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह, आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सहभागी झाले होते.

गुवाहाटी - राज्यघटनेतील ३७० वे कलम हे तात्पुरतेच होते. पण, ३७१ वे कलम मात्र ईशान्येसाठीची विशेष तरतूद आहे. या दोन्ही कलमांमध्ये खूप फरक आहे. ईशान्येसाठीच्या या विशेष कलमाला आमचे सरकार कधीच हात लावणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. ते येथे ईशान्येकडील राज्यांच्या परिषदेत बोलत होते.

‘केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरमधील ३७० वे कलम संपुष्टात आणल्यानंतर काही लोकांनी आता ३७१ व्या कलमावरून ईशान्य भारतामध्ये चुकीचा प्रचार करायला सुरवात केली आहे. 

केंद्र सरकार हे कलमदेखील संपुष्टात आणेल, असे लोकांना सांगितले जात आहे, या संदर्भात मी आधीच संसदेत स्पष्टीकरण दिले असून, आताही मी ईशान्य भारतातील काही बड्या मंत्र्यांच्या उपस्थितीत या बाबीचा पुनरुच्चार करतो आहे. सरकार या कलमाला कधीच धक्का लावणार नाही,’ असे शहा यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेबाबत (एनआरसी) लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या शंकाकुशंका आहेत. 

एकाही घुसखोराला आमचे सरकार देशामध्ये राहू देणार नाही, हाच आमचा निर्धार आहे. आताही ‘एनआरसी’ यादीच्या निर्मितीची प्रक्रिया कालबद्धरीतीने पूर्ण करण्यात आली होती, असे शहा यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com