'अमित शहांच्या दृष्टीने भारतीय सैन्य खोटं बोलतंय'

amitshah
amitshah

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले असल्याचा दावा काल (ता. 3) गुजरातमध्ये बोलताना केला. यावर आक्षेप घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत अमित शहा यांच्यावरक निशाणा साधला आहे. भारतीय सैन्यदलाने कोणताही आकडा जाहीर केलेला नाही, तर शहा 250 हा आकडा कसा सांगू शकतात, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे. 

'अमित शहा यांच्या दृष्टीने सैन्यदल खोटे बोलत आहे का? सैन्यदलाने स्पष्ट सांगितले आहे की, किती लोक ठार झाले याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही. निवडणुकीत आपल्या फायद्यासाठी अमित शहा खोटं बोल आहेत? देशाचा सैन्यदलावर विश्वास आहे, पण भाजपचा सैन्यावर विश्वास नाही का?' असे सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत. तसेच सैन्यदल खोटे बोलू शकत नाही, मग भाजप खोटं बोलत आहे. सगळा देश हा सैन्यासोबत आहे, पण भाजप सैन्यासोबत नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे. 

मागच्या महिन्यात पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. हवाई दलाने मागच्या आठवड्यात पाकिस्तानातील बालाकोट येथे एअर स्ट्राईक करुन जैश-ए-महंम्मदचा सर्वात मोठा प्रशिक्षण तळ उडवला होता. यावरून विरोधक आता सरकारकडे पुरावे मागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com