दिल्लीतील हिंसाचारानंतर केंजरीवालांचं केंद्राकडे बोट, म्हणाले..

'मी दिल्लीतील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो'
 ARVIND KEJARIWAL
ARVIND KEJARIWALsakal
Summary

'मी दिल्लीतील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो'

शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचाराच्या घटनेमुळे दिल्ली हादरुन निघाली आहे. जहांगीरपुरी परिसरात हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी दोन समुदायांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेत अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून काही वाहने जमावाने जाळल्याचे माहितीही समोर आली. आता या घटनेसंबंधी राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे.

 ARVIND KEJARIWAL
पाकिस्तानचे अफगाणिस्तानवर हवाई हल्ले; सुमारे ३० जणांचा मृत्यू?

दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात घडलेल्या घटनेमुळे बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, जहांगीरपुरीमध्ये मिरवणुकीवर झालेली दगडफेकीची घटना ही अत्यंत निंदनीय आहे. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे मी दिल्लीतील सर्व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. राजधानीमध्ये शांतता राखण्याचे काम हे केंद्र सरकारचे असल्याचेही ते म्हणाले आहेत.

 ARVIND KEJARIWAL
श्रीलंकेत आर्थिक संकट गडद, आता शेअर बाजारात 'नो ट्रेडिंग'

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मी दिल्लीतील नागरिकांना शांततेचं आवाहन करतो. याशिवाय राजधानी दिल्लीत शांतता राखण्याचे काम हे केंद्र सरकारचं आहे. त्यामुळे शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्राने प्रयत्न करावेत. देशात शांतता नसेल तर देशाची प्रगती खुंटते असल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com