काश्मीरमधील 'हा' जिल्हा झाला दहशतवादमुक्त

काश्मीरमधील 'हा' जिल्हा झाला दहशतवादमुक्त

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकदा चकमक होत असते. मात्र, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने आणखीन तीव्र केली. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकेकाळी 'हिज्बुल'चा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. 

लष्करातील जवानांच्या या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या पहिलाच जिल्हा ठरला आहे. बारामुल्ला येथे काल (बुधवार) झालेल्या चकमकीत तीन दहशवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

दरम्यान, भारतीय लष्कराने चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडे असलेले तीन एके-47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच या दहशतावाद्यांवर ग्रेनेड हल्ला आणि तीन तरुणांच्या हत्येचाही आरोप असल्याची माहिती मिळत आहे.

एकही दहशतवादी जिवंत नाही : पोलिस महासंचालक

''बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यात एकही जिवंत दहशतवादी नाही'', अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com