बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखीत

बेळगावच्या राजकारणात जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखीत

बेळगाव - गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांना मंत्रीपद मिळाल्यामुळे बेळगाव जिल्हाच्या राजकारणातील जारकीहोळी बंधूंचे वर्चस्व अधोरेखीत झाले आहे. 2005 सालापासून म्हणजे गेली बारा वर्षे जारकीहोळी घराण्याकडे मंत्रीपद आहे. यावेळी जारकीहोळी बंधूंची संधी हुकणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती, पण रमेश यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्यामुळे ही चर्चा आता थांबली आहे.

सतीश व रमेश जारकीहोळी या दोघानीही मंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती, त्यात रमेश यांनी बाजी मारली. 2016 साली पहिल्यांदा रमेश हे पहिल्यांदाच मंत्री झाले, त्यांना लघुउद्योग खात्याची जबाबदारी मिळाली. आता पुन्हा पक्षनेतृत्वाने रमेश यानाच संधी दिली आहे. 

 रमेश, सतीश व भालचंद्र या तिन्ही जारकीहोळी बंधूचा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वरचष्मा राहिला आहे. रमेश हे आधीपासून कॉंग्रेस पक्षातच आहेत. पण सतीश व भालचंद्र हे मूळचे जनता परीवारातील आहेत. रमेश यानी 1995 साली गोकाक मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली, पण त्यांचा पराभव झाला. 1999 साली ते पहिल्यांदा विधानसभेवर गेले, त्यानंतर त्यांचा पराभव करणे त्यांच्या विरोधकाना शक्‍य झालेले नाही.

सतीश जारकीहोळी यांची राजकीय कारकीर्द विधानपरीषद सदस्य म्हणून सुरू झाली. धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून ते दोनवेळा विधानपरीषदेवर निवडून गेले. विधानपरीषद सदस्य असताना 2004 साली राज्यात कॉंग्रेस व धजदचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभराने म्हणजे 2005 साली त्यांना वस्त्रोद्योग खात्याचे मंत्रीपद मिळाले. जारकीहोळी बंधूपैकी सतीश याना मंत्री होण्याची संधी सर्वात आधी मिळाली. 2006 साली त्यांनी धजद सोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 2008 साली मतदारसंघ पुनर्रचनेत यमकनमर्डी या नवा मतदारसंघ तयार झाला. 2008 साली त्यानी यमकनमर्डीतून पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढविली व जिंकलीही.

2013 साली राज्यात कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आल्यावर त्याना पुन्हा मंत्रीपद मिळाले. आधी त्याना अबकारी खाते मिळाले, पण दोन वर्षात त्यानी हे खाते सोडले. त्याना लघुउद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली. पण 2016 साली त्यांचे मंत्रीपद काढून घेवून त्यांचे बंधू रमेश यांना देण्यात आले. भालचंद्र जारकीहोळी 2004 पहिल्यांदा धजदकडून आरभावी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले.

2006 साली भाजप व धजदचे सरकार सत्तेत असताना भालचंद्र यांना पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले. 2008 साली ते आधी ते धजदकडून निवडून आले, पण त्यांनी आमदारकीचा राजीनामा देवून भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणूकीत ते पुन्हा निवडून आले, भाजप सरकारमध्ये त्याना मंत्रीपद मिळाले. 2005 सालापासून जारकीहोळी घराण्याकडील मंत्रीपद कायम आहे. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचा दबदबा कायम राहणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com