'लू'च्या बळींची संख्या दोनशेवर; चोवीस तासांत 80 जण मृत्युमुखी

Bihar Heatwave
Bihar Heatwave

पाटणा : बिहारमधील उष्म्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आज दोनशेच्यावर पोचली. गरम वाऱ्यांच्या 'लू'मुळे गेल्या 24 तासांत 80 जण मरण पावले. गया शहरात प्रशासनाने जमावबंदीचा आदेश (कलम 144) लागू केला आहे. 
बिहारवर सध्या चमकी तापाचे संकट असताना त्यात उष्म्याची भर पडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ताप आणि लूमुळे उद्‌भवलेल्या स्थितीचा आढावा घेऊन आरोग्यसेवेला वेगाने काम करण्याचा आदेश दिला.

राज्याच्या औरंगाबाद, गया, नवादा, खगडिया, भागलपूर आणि पाटणामध्ये लूमुळे मरण पावलेल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. 80 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली असली तरी, एव्हाना हा आकडा दोनशेच्या वर गेला आहे. लूमुळे मरण पावलेल्यांचे शवविच्छेदन करण्याची सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे चार लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्यामुळे ही सूचना देण्यात आली आहे.

चमकी तापाच्या साथीबाबत निष्काळजीपणा केल्याचा आरोप करून केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पाण्डेय यांच्याविरुद्ध मुझफ्फरपूरमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशमी यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ती दाखल करून घेतली असून, येत्या 24 जूनला त्यावर सुनावणी होईल. सरकारच्या बेपर्वाईमुळे तापाच्या साथीत 82 मुले मरण पावल्याची तक्रार याचिकेत करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com