राहुल गांधी, तुम्ही कधी बैल तरी जुंपलेत का? : अमित शहा

राहुल गांधी, तुम्ही कधी बैल तरी जुंपलेत का? : अमित शहा

नवी दिल्ली : ''राहुल गांधी शेतकरी-शेतकरी म्हणतात. मात्र, त्यांनी कधी दोन बैलं तरी जुंपलेत का? तुमच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर युरियासाठी लाठीमार केला जात होता'', अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) निशाणा साधला. 

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-काँग्रेससह इतर काही पक्षांकडून राज्यात प्रचारसभा घेण्यात येत आहेत. बालाघाट येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शहांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''राहुल गांधी यांच्याकडून शेतकऱ्यांबाबत बोलले जाते. ते सतत शेतकरी-शेतकरी म्हणतात. असे ते म्हणत असले तरी त्यांनी कधी दोन बैलं तरी जुंपलेत का?'', असा सवाल केला. तसेच "तुमच्या (यूपीए) सरकारच्या कार्यकाळात युरियासाठी शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला होता'', असेही ते म्हणाले. 

दरम्यान, मध्यप्रदेशात 28 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com