पराभव दिसू लागल्यानेच भाजपाला राम मंदिराची आठवण- मायावती

पराभव दिसू लागल्यानेच भाजपाला राम मंदिराची आठवण- मायावती

लखनौ- भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये पराभव दिसू लागल्यानेच त्यांना राम मंदिराची आठवण झाली असल्याचे मत बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी व्यक्त केले आहे. भाजपला लोकांचे लक्ष विकासाच्या मुद्यांवरून हटवायचे आहे आणि त्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, भाजपचा हेतू चांगला असता तर, त्यांना कामे करण्यासाठी पाच वर्षे थांबण्याची गरज नव्हती. भाजपला आपला पराभव समोर दिसत असल्यानेच त्यांनी लोकांचे लक्ष राम मंदिरासारख्या मुद्यांकडे वेधण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने दिलेल्या 50 टक्के आश्वासनांचीही त्यांच्याकडून पूर्तता झालेली नाही. केंद्रात आणि राज्यांत विकास करण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे आणि म्हणूनच, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पराभूत होण्याच्या मार्गावर आहे.

भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते की, ते छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत येणार नाहीत, यामुळेच त्यांनी राममंदिराचा भावनिक मुद्दा बाहेर काढला आहे. तसेच त्यांचे सहकारी पक्ष शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदही राम मंदिराच्याच मुद्यावर राजकारण करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com