Budget 2019 : नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प- मोदी

 Budget 2019 : नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा अर्थसंकल्प- मोदी

अर्थसंकल्प 2019 : नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा आणि नव्या भारताच्या दिशेने पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. या बजेटमुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल असाही विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.

21व्या शतकातील आशा आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामुळे विकासाचा वेग वाढणार आहे. देशाची विकासाची गती योग्य आहे असेही मोदींनी सांगितले. इलेक्ट्रिक मोबिलिटी, सोलर सेक्टर यावर अर्थसंकल्पात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. पर्यावरणाचा विचार करून अर्थसंकल्पात करण्यात आला आहे ही देखील चांगली बाब आहे.

देशातील गरीब जनतेचा, प्रत्येक घटकाचा विचार करून सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी येईल. या अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीयांचीही प्रगती साधली जाईल. नवभारत निर्मितीच्या पथावर जाणारे हे बजेट आहे असेही मोदींनी म्हटले आहे.

सीतारमन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पात त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार चालू शकणार आहे ही महत्त्वाची घोषणा केली. तसेच सोनं आणि इंधन यावरचा कर वाढवला आहे त्यामुळे आता सोनं आणि पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com